भाजपाच्या आणि संघाच्या केंद्रीय नेत्यांना विचारलं पाहिजे, आंबेडकर थेटच बोलले

ब्युरो टीम :  ‘भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास भाग पाडून त्यांचा अपमान केलाय,’ असं वक्तव्य बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. ते पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती. पण त्यांच्या अध्यक्षांनी आणि केंद्रीय नेतृत्वाने त्यांना आदेश दिला की तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा. त्याप्रमाणे त्यांनी शपथ घेतली म्हणून मी म्हणालो की भाजपामुळे फडणवीसांचा शंकरराव चव्हाण झाले,” असं स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकरांनी दिलं. “तुम्ही भाजपाच्या आणि संघाच्या केंद्रीय नेत्यांना विचारलं पाहिजे की, तुम्ही फडणवीसांचा अपमान करण्यासाठी त्यांना उपमुख्यमंत्री पदं दिलं आहे का?, नियंत्रण ठेवायचं होतं तर चंद्रकांत पाटील पण होते,” असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. 
दरम्यान, “चंद्रकांत पाटील हे अमित शाह यांच्या जवळचे आहेत. मागच्या सरकारमध्ये चंद्रकांत पाटील हे उपमुख्यमंत्र्यासारखेच वागले.एकनाथ शिंदे यांना नियंत्रणात ठेवायचं होतं तर ते चंद्रकांत पाटीलही करू शकले असते. देवेंद्र फडणवीसांचा बळी का?”, असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी ट्विटरवरुन विचारला आहे. तसेच त्यांनी आमची सहानुभूती देवेंद्र फडणवीसांसोबत आहे अशा अर्थाचा हॅशटॅगही वापरला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने