हे सरकार म्हणजे सरकारला दुर्योधन आणि दु:शासन, काँग्रेस नेत्याने केली टीका


ब्युरो टीम : काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यातून राज्यातील शिंदे गट आणि भाजपा युतीच्या सरकारवर आपल्या ट्वीटमधून ताशेरे ओढले आहेत. सचिन सावंत यांनी विद्यमान सरकारला दुर्योधन आणि दु:शासन यांच्या हातमिळवणीची उपमा दिली आहे.

महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर राजकीय गणितं बदलू लागली आहेत. त्यात शिवसेनेचाच एक गट भाजपासोबत गेल्यामुळे यापुढील राजकीय घडामोडींविषयी अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत. विधानसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये एकनाथ शिंदे सरकारचं बहुमत सिद्ध झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगू लागलं आहे. काँग्रेसकडून राज्य सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका करण्यात आली आहे. काँगेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विट केले असून त्यामध्ये म्हटलंय की, 'दुर्योधन’ म्हणजे वाईट मार्गाने मिळवलेले धन व ‘दु:शासन’ म्हणजेच मोदी सरकारचे अत्याचारी व कुटील शासन या दोन्हींनी मिळून केलेल्या लोकशाहीच्या वस्त्रहरणातून महाराष्ट्राचे सध्याचे सरकार अस्तित्वात आले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या जल्लोषात जनतेची घृणा वाढत आहे हे लक्षात ठेवा'. शेवटच्या वाक्यात सचिन सावंत यांनी भाजपाला इशारा दिल्याचं दिसून येत आहे.

 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने