आता नगराध्यक्ष जनतेतूनच निवडणार, शिंदेंची जोरदार बॅटिंग, विधेयक मंजूर



ब्युरो टीम: 'थेट नगराध्यक्ष करावा असा निर्णय 2006 साली घेतला होता. असे निर्णय आताच आपण बदलला असे नाही. नगरविकास मंत्र्याने निर्णय घेतला तो एका मंत्र्यांचा निर्णय नसतो तो सर्व मंत्र्यांचा असतो, त्यामुळे आता नगराध्यक्ष निवडीचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी केली.

             मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट नगराध्यक्ष निवड व्हावी यासंदर्भातील विधेयकावर विधानसभेतप्रस्ताव मांडला होता. पण नगराध्यक्षांची निवड ही जनतेून होईल, यासाठी विरोधकांनी कडाडून विरोध केला. पण, शिंदे यांनी जोरदार भूमिका मांडली.

      'थेट नगराध्यक्ष करावा असा निर्णय 2006 साली घेतला होता. असे निर्णय आताच आपण बदलला असे नाही. नगरविकास मंत्र्याने निर्णय घेतला तो एका मंत्र्यांचा निर्णय नसतो तो सर्व मंत्र्यांचा असतो, त्यामुळे आता नगराध्यक्ष निवडीचा निर्णय घेण्यात आला आहे. अजित दादा तुम्ही म्हणाले, मुख्यमंत्री हा जनतेतून निवडा. मुख्यमंत्र्यांची निवडही लोकशाही पद्धतीने होते. नगराध्यक्ष निवडीचा अधिकार हा राज्यांचा आहे, भाषण करताना तोंडातून निघत होते जनतेतून निवडून द्या. त्यामुळे आता संविधान बदलायचे का? असा सवाल शिंदेंनी केला.

      'तुम्ही म्हणता तसे कोण अख्या शहरात दादागिरी करू शकतो का, आव्हाड साहेब तुम्ही मुंब्र्यात करू शकतात पण अख्या शहरात करू शकता का? असे अनेक नगराध्यक्ष आहेत ज्यांनी चागले काम केलेले आहेत. एक वर्ष झाले त्याच्यावर अविश्वास ठराव आणायचा किमान त्याला अडीच वर्षे स्थिर स्थावर करायचे, आम्ही अडीच वर्षे इथे बसलेलो आहोत, असंही शिंदे म्हणाले.

       'जो चुकीचा कारभार करेल त्यावर कारवाई केली जाईल. भास्कर जाधव यांनी तर पूर्ण नगरविकास वाचून दाखवला. 9 हजार ग्रामपंचायत यांनी निर्णय केला थेट सरपंच जनतेतून निवडला. आमचा स्वतःचा अजेंडा काहीच नाही जे जनता म्हणेल ते करणार आहे, असंही शिंदेंनी ठणकावून सांगितलं.


आपण सगळ्या गोष्टी विचारांमध्ये घेऊन निर्णय घेतला. बरेच जण म्हणाले, कुणाच्या आग्रहाखातर निर्णय घेतला, खांद्यावर बंदूक ठेवून निर्णय घेतला. पण, असं काही नाही. जे जनता म्हणणार तेच आम्ही करणार आहे. मी निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे. ' देवेंद्र और मैं है साथ साथ...मेरा भी नाम है एकनाथ' अशी शायरी म्हणताच फडणवीस यांनी जोरदार दाद दिली, सभागृहात एकच हश्शा पिकली.

         जर मी सक्षम नसतो तर एवढा कार्यक्रम केला असता का? करेक्ट कार्यक्रम झाला की नाही, जयंत राव मला भेटले. असं कसं झालं विचारलं होतं. कुणी खांद्यावर बंदुक ठेवली, हे सगळं दादांना माहिती आहे.दा दा मला म्हणाले तू आधी सांगितले असते तर कानात सांगितले असते. पण दादा ते तुमचं ऐकत होते. आमचं ऐकत नव्हते, तोच तर प्रॉब्लेम होता, तिथेच प्रॉब्लेम झाला, सगळ्या गोष्टी घडल्या, अशी टोलेबाजीही शिंदेंनी केली.

 ---------- 




0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने