आदिवासी व्यवहार राज्यमंत्री बिशेश्वर टूडू यांनी पालघर जिल्ह्याचा घेतला आढावा.

 


केंद्रीय जलशक्ती आणि आदिवासी व्यवहार राज्यमंत्री बिशेश्वर टूडू हे पालघरच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आले असून आज त्यांनी वसई - विरार भागाचा दौरा केला.केंद्र शासनाच्या योजना आणि त्यांचे लाभ लोकांपर्यंत पोहचत असल्याची सुनिश्चिती आणि यामध्ये अडथळे असल्यास ते जाणून  घेण्यासाठी हा दौरा असल्याचे त्यांनी सांगितले.. पालघर जिल्ह्यातल्या विरारच्या जीवदानी माता मंदिरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी त्यांनी वसई - विरार भागातल्या केंद्रशासनाच्या विविध योजनांचा आढावा घेतला आणि विविध लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. लाभार्थ्यांच्या विविध समस्या, त्यांच्या सूचना यावेळी केंद्रीय मंत्री बिशेश्वर तूडू यांनी समजून घेतल्या. तसेच या भागात पिण्याचं पाणी, रस्ते, आरोग्य सुविधा या विषयी जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांशी तसचं दौऱ्यानंतर वरिष्ठ स्तरावर ही आपण चर्चा करणार असल्याचं टूडू यांनी सांगितलं.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने