न्यायमूर्ती लळीत हे भारताचे ४९ वे सरन्यायाधीश पदाची घेतली शपथ.


        न्यायमूर्ती यू. यू. लळीत यांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. राष्ट्रपती भवनात शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. न्यायमूर्ती लळीत हे भारताचे ४९ वे सरन्यायाधीश बनले आहेत. या शपथविधी सोहळ्यास उपराष्ट्रपती जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते.

        नवे सरन्यायाधीश न्या. उदय लळीत यांचा कार्यकाळ तीन महिन्यांपेक्षाही कमी असणार आहे. ८ नोव्हेंबर रोजी ते निवृत्त होणार आहेत. या दरम्यान महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासह इतर महत्त्वांच्या प्रकरणांचा निकाल लागणार का याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे. “प्रत्येक प्रकरणांच्या यादीत पारदर्शकता आणण्याचा माझा प्रयत्न असेल. तसेच तातडीची प्रकरणे संबंधित खंडपीठांसमोर मुक्तपणे मांडता येतील यासाठी प्रयत्न करणार असून वर्षभर चालेल, असे एक घटनापीठ बनवण्याची इच्छा त्यांनी वयक्त केली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने