ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव. भारताने 2-1 ने मालिका जिंकली

 


भारताने तिसऱ्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्स राखून पराभव केला. या अंतिम सामन्यात भारताला शेवटच्या षटकात 11 धावांची गरज होती.  अंतिम षटकात विराट कोहली आणि हार्दिक पांड्या क्रीजवर होते. ऑस्ट्रेलिया कडून डॅनियल सॅम्स गोलंदाजी करत होता. कोहलीने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. मात्र, पुढच्याच चेंडूवर कोहलीने झेलबाद झाला. यानंतर आलेल्या  दिनेश कार्तिकने तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. भारताला शेवटच्या तीन चेंडूत चार धावा हव्या होत्या. परंतु चौथ्या चेंडूवर हार्दिकला एकही धाव करता आली नाही. पाचव्या चेंडूवर सॅम्सने वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु हार्दिकने चेंडू टोलवला आणि थर्ड मॅनकडे त्याला चार धावा मिळाल्या. अशा प्रकारे भारताने सहा विकेट्स राखून ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.

या विजयासह भारताने तीन सामन्यांची T20 मालिका 2-1 ने जिंकली. याआधी पहिला टी-20 सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा टी-20 सामना भारताने जिंकला होता. तिसऱ्या T20 मध्ये प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 187 धावांचे लक्ष्य ठेवले होते. कॅमेरून ग्रीनने 21 चेंडूत 52 तर टीम डेव्हिडने 27 चेंडूत 54 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने १९.५ षटकांत चार गडी गमावून लक्ष्य गाठले. भारताकडून सूर्यकुमार यादवने 36 चेंडूत 69 धावा केल्या. तर  विराट कोहलीने 48 चेंडूत 63 धावांची खेळी केली.

भारतीय संघाला मायदेशात नऊ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला टी-20 मालिकेत पराभूत करण्यात यश आले आहे. 2013 पासून ऑस्ट्रेलियाला टी-20 मालिकेत पराभव पत्करावा लागला नव्हता. आता टीम इंडियाला नऊ वर्षानंतर प्रथमच कांगारूंना त्यांच्या घरच्या मालिकेत पराभूत करण्यात यश आले आहे. 2017-18 मध्ये ही मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली आणि 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलियाने 2-0 ने जिंकली होती.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने