जायकवाडी धरणातून 99 हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु.

 


गोदावरी नदीमध्ये विविध प्रकल्पांमधून करण्यात येणारा विसर्ग अद्याप सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरणातून 99 हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यावर्षी जुलै महिन्यातच जायकवाडी धरणातून पाणी सोडावे लागले होते. दरम्यान दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. त्यामुळं जायकवाडी धरणातील आवक सुद्धा वाढली आहे. 

त्यामुळेच जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाचे संपूर्ण 27 दरवाजे उघडण्यात आले आहेत. यापूर्वी 18 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू असताना आता, आपत्कालीन 9 दरवाजे सुद्धा उघडण्यात आले आहे. त्यामुळं बीड जिल्हातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील शनीचे मंदिर पाण्याखाली गेले आहे     

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने