महिंद्रा सी आय ई कंपनीचा स्वच्छता अभियान कार्यक्रम



आळंदी: महिंद्रा सी आय इ कंपनीच्या वतीने श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी दि. १० सप्टेंबर २०२२ ला स्वच्छता अभियान राबविण्यात आले. गणपती विसर्जना वेळी अस्वच्छ झालेला परिसर स्वच्छ करण्यात आला जसे की निर्माल्य कचरा याची स्वच्छता करण्यात आली. तसेच मंदिर परिसर व नदीचा घाट परिसर स्वच्छ करण्यात आला. यामुळे आळंदी परिसर स्वच्छ करण्यात आला. या स्वच्छता उपक्रमा दरम्यान जवळपास ९०० किलो कचरा गोळा केला. या कार्यक्रमाच्या मोहिमेसाठी महिंद्रा सी आय चे श्री. अनुप मिश्रा Chief business Controller आणि कंपनीचे कर्मचारी व अधिकारी यांचा सहभाग होता. तसेच स्किल सोनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचे सहकार्य लाभले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने