75 वर्षांपूर्वी ज्यांच्या कार्यकाळात आपल्या देशाचे विभाजन झाले, तो काँग्रेस पक्ष ‘भारत तेरे तुकडे होंगे’च्या घोषणा देणार्या कन्हैयाकुमारला सोबत घेऊन ‘भारत जोडो’ यात्रा काढत आहे. जे लोक भारतमातेला ‘अपवित्र’ मानतात तसेच हिंदूंच्या देवी-देवतांना न मानता त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण करतात. अशा लोकांना घेऊन राहुल गांधी सोबत घेऊन यात्रा काढतात, त्यावेळी त्यांच्या उद्देशावरच प्रश्न निर्माण होतो. अशा भारतमातेचा अवमान करणार्यांना घेऊन ‘भारत जोडो’चा कोणता प्रयत्न काँग्रेस करत आहे, असा परखड प्रश्न हिंदु जनजागृती समितीचे दिल्ली राज्य प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांनी उपस्थित केला. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ संवादात बोलत होते.
या वेळी ‘भारत व्हाईस’च्या संस्थापिका गायत्री एन्. म्हणाल्या की, जॉर्ज पोनैय्या यांनी नुकतेच भारतमातेचा अवमान करणारे वक्तव्य केले. त्यांनी एक वर्षापूर्वीही भारतमातेला शिव्या देऊन वादग्रस्त वक्तव्ये केली होती. ज्या धरतीला आपण मातेसमान मानतो, त्याविषयी घृणास्पद वक्तव्य करण्यार्या या व्यक्तीची मानसिकता यातून लक्षात येते.
टिप्पणी पोस्ट करा