अप्पी आणि अर्जुन त्यांचा समोरच्या आव्हानांना सामोरे कसे जातील?

ब्युरो टीम: मुंबई- 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेनं अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. खेडेगावात राहणाऱ्या आणि आर्थिक परिस्थिती जेमतेम असलेल्या अप्पीला कलेक्टर व्हायचं आहे. त्यासाठी ती जीवतोडून मेहनत घेत आहे. अभ्यास करत आहे. तिच्या अभ्यासामध्ये अनेक अडथळे येतात परंतु त्यावर अप्पी जिद्दीनं मात करते. यामध्ये तिला अर्जुनची नकळत साथ मिळत असते.

      अप्पी आमची कलेक्टर मालिकेबद्दल प्रेक्षकांच्या मनातही आता उत्सुकता निर्माण झाली आहे. मालिकेत आतापर्यंत अनेक चढउतार आले आहेत. अप्पीसारखीच यूपीएसची परीक्षा प्रमोद नावाचा एक मुलगा देत असतो. परंतु परीक्षेमध्ये सतत अपयशी ठरल्यानं तो निराशेच्या गर्तेत जातो आणि आत्महत्या करतो. ही बातमी समजल्यानंतर अप्पी त्याला समजुतीच्या चार गोष्टी सांगते. तसंच पुन्हा एकदा परीक्षा देण्यासाठी तयार करते. आपल्या समजूतदार स्वभावामुळे अप्पी प्रमोदचं आयुष्या सावरते. परंतु प्रमोदला समजावत असताना अप्पीला पण प्रश्न पडतो की, यूपीएसचीची परीक्षा आपण पहिल्या प्रयत्नात यशस्वीपणं उत्तीर्ण होऊ शकू ना?

        दरम्यान दुसऱ्या प्रसंगात अर्जुनला बदलीसाठी प्रताप तीन लाख रुपये मागतो. अर्जुन प्रतापला तीन लाख रुपये कसे देईल ? अप्पी आणि अर्जुन त्यांच्या समोर आलेल्या आव्हानांना पेलू शकतील? या सगळ्या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांनी अप्पी आमची कलेक्टर या झी मराठीवरून प्रसारित होणाऱ्या मालिकेच्या आगामी भागांतून मिळतील. ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होते.

------


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने