माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील शेवटचा सीन शूट करताना समीर झाला भावुक



ब्युरो टीम: गेल्या काही दिवसांपासून झी मराठी  वाहिनीवर नवीन मालिका दाखल होताना दिसत आहेत. त्यामुळे जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत.

अशातच लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली 'माझी तुझी रेशीमगाठ' हा प्रेक्षकांची आवडती मालिका देखील प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यश व नेहाच्या प्रेमाची कथा सांगणारी ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

       या मालिकेतील यशचा मित्र समीरची भूमिका साकारणार संकर्षण कऱ्हाडेनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यानं समीर आणि यशच्या शेवटचा सीन शूट झाल्याचं प्रेक्षकांना सांगितलं. यावेळीचे फोटो शेअर करत त्यानं एक भावनिक पोस्टही लिहिली आहे. संकर्षणने लिहिले, बाय बाय यश समीर. काल आम्ही यश आणि समीर म्हणुन "माझी तुझी रेशीमगाठ" मालिकेतला शेवटचा सीन शूट केला.

        मला माझ्या मित्राची , यशची ..माझ्या पात्राची , समीरची .. आणि त्यांच्या अफ्फलातून मैत्रीची कायम आठवण येत राहील .. I LOVE YOU @shreyastalpade27 दादा..I miss you ही दोस्ती तुटायची नाय ..(खूप बोलायचंय .. सांगायचंय.. सविस्तर लिहिनच..) यश आणि समीरच्या मैत्रीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने