“राज्यातील जिल्ह्यांना पालकमंत्री नेमण्याची मुख्यमंत्र्यांना लवकरात लवकत सद्बुद्धी गणरायाने द्यावी”,- एकनाथ खडसे

 


ब्युरो टीम: राज्यातील सत्तासंघर्षावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या भीतीमुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंत्रीमंडळ विस्तार लांबवावा लागला, अशी टीका जळगावातील राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे. मंत्रीमंडळ विस्तार झाला असला तरी अद्याप पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत, यावरु खडसे यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. “राज्यातील जिल्ह्यांना पालकमंत्री नेमण्याची मुख्यमंत्र्यांना लवकरात लवकत सद्बुद्धी गणरायाने द्यावी”, असे साकडे त्यांनी गणपतीला घातले आहे.

गणरायाने मुख्यमंत्र्यांना सुदबुद्दी द्यावी

          गणपती बुद्धीचा देवता आहे. विघ्नहर्ता आहे. मी गणपतीला विनंती करतो की, पालकमंत्री नेमण्याची मुख्यमंत्र्यांना लवकरात लवकर बुद्धी द्यावी. राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे जनता त्रस्त आहे. त्याची वेदना आहे. त्यामुळे लवकरात लवकर पालकमंत्री नेमून गावागावांपर्यंत बैठका घेऊन सरकार सक्रिय व्हावे, असे साकडे एकनाथ खडसे यांनी गणपतीला घातले आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची भीती असल्याने मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळाचा विस्तार व पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या लांबवल्या असाव्यात, असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे.

विरोधकांना नाथाभाऊ उरून पुरला

          जळगाव जिल्ह्यात शून्यातून भाजप उभा राहिला, याचे श्रेय आपले असल्याचेही खडसे यांनी म्हटले आहे. अनेक आमदार-खासदारांना जिल्ह्यात निवडून आणले. जसं एखाद्या पार्टीचे यश असते तसेच ते नेतृत्वातही यश असते, असे सांगत त्यांनी भाजपावर टीका केली आहे. गेल्या ३० ते ३५ वर्षापासून नाथाभाऊ विरोधकांना उरून पुरला म्हणत. ज्यावेळी भाजपात होतो, त्यावेळी नागरिकांनी मला चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात शून्यातून भाजप उभा राहिला व अनेक आमदार-खासदार जिल्ह्यातून निवडून आले, असे त्यांनी म्हटले आहे. विरोधकांना आपल्याला नाउमेद केल्याशिवाय यश मिळणार नाही, त्यामुळे सर्वच विरोधक एकवटले असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.      

---------


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने