कोहली T20 विश्वचषकानंतर निवृत्त होऊ शकतो: शोएब अख्तर


 

        पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज  शोएब अख्तरने एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे म्हणाला की, "विराट कोहली T20 विश्वचषकानंतर निवृत्त होऊ शकतो. तो हे पाऊल आपली इतर फॉरमॅटमधील कारकीर्द लांबवण्यासाठी उचलू शकतो" तो पुढे म्हणाला. "त्याच्या जागी मी असतो तर मीही असेच केले असते, आपली कारकीर्द मोठी व्हावी यासाठी हा निर्णय घेतला असता." शोएब अख्तरच्या या वक्तव्यानंतर त्याला ट्रोल केले जात आहे. याआधी शाहिद आफ्रिदीनेही विराट कोहलीला योग्य वेळी निवृत्ती घेण्याचे आवाहन केले होते. त्याने विराट कोहलीला सांगितले की, जेव्हा तू तुझ्या सर्वोच्च शिखरावर असशील तेव्हाच तू निवृत्तीची घोषणा कर.

        विराट कोहलीने नुकतेच आपले ७१ वे शतक झळकावले होते. गेल्या ३ वर्षांपासून तो फॉर्ममध्ये होता. प्रत्येकजण त्याच्या शतकाची आतुरतेने वाट पाहत होता. वन कप टी-20 सामन्यात विराट कोहलीने तब्बल 1020 दिवसांनी शतक झळकावले होते. यासह त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगची बरोबरी केली. रिकी पाँटिंगच्या खात्यात ७१ शतके आहेत. भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर शतकांच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे. त्याच्या खात्यात 100 शतके आहेत. दुसरीकडे, विराट कोहली सचिनच्या विक्रमाच्या जवळपास पोहोचेल, अशी आशा भारतीय चाहत्यांना आहे. यासोबतच भारतीय चाहत्यांना यावेळच्या टी-२० विश्वचषक आणि पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात विराट कोहलीकडून चांगल्या धावांची अपेक्षा आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने