नाशिक जवळ खाजगी बसचा भीषण अपघात, 11 जणांचा होरपळून मृत्यू.

 


महाराष्ट्रातील नाशिकमधून भीषण बस अपघाताची बातमी समोर आली आहे.(Nashik Bus Fire) एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, काल रात्री नाशिकमध्ये एका बसला आग लागली. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. औरंगाबाद रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला आहे. मिरची चौकात पहाटेच्या सुमारास खासगी बसला अचानक आग लागली. ही आग इतकी भयंकर होती की संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. 

शनिवारी पहाटे 4 वाजून 20 मिनिटांनी हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांचं पथक दाखल झालं आहे. तसंच, बचावकार्य सुरू असल्याचं म्हटलं जात आहे.  त्याचवेळी नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत सुमारे 11 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मृतांचे मृतदेह आणि जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे. या अपघातात जखमींवर उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने