देश हुकूमशाहीकडे जात आहे, संविधानाची पायमल्ली होत आहे: खा. अरविंद सावंत

 


निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, शिवसेना हे नावही वापरता येणार नाही आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगने घेतलेला हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे गटासाठी एक मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. 

या निर्णयाविरोधात आम्ही मुंबई उच्च न्यायालयात दाद मागू असे उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी सांगीतले आहे ANI शी बोलताना ते म्हणाले "कोणतीही सुनावणी न करता, चौकशी न करता त्यांनी आमचे निवडणूक चिन्ह गोठवले आहे. देश हुकूमशाहीकडे जात आहे. संविधानाची पायमल्ली होत आहे. आम्ही मुंबई उच्च न्यायालयात जाणार" तर या निर्णयानंतर आम्ही लवकरच आमची आगामी रणनीती ठरवू अशी प्रतिक्रिया शिंदे गटातील नेते भरत गोगावले यांनी दिली आहे. 

आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार आता शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांना आगामी निवडणुकीसाठी शिवसेना हे नाव वापरता येणार नाही. तसेच दोन्ही गटांना धनुष्यबाण या चिन्हाचाही वापर करता येणार नाही. निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटाला दोन वेगवेगळी चिन्हे दिली जातील. या निर्णयानंतर दोन्ही बाजूनी पुढील रणनीती ठरवण्याची हालचाल सुरु झाली आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने