व्यवसाय करायचा आहे, मग करा छोट्या गुंतवणूकीतून मोठी कमाई

 


आपणास व्यवसाय करायचा आहे परंतु आर्थिक कारणामुळे बऱ्याच वेळा ते शक्य होत नाही, परंतु आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल सांगणार आहोत, जो तुम्ही कमी गुंतवणूक करून घरबसल्या सुरु करू शकता आणि त्यातून लाखो रुपये कमवू शकता. आजकाल औषधी वनस्पतींची मागणी सर्वत्र खूप वाढली आहे. तुम्ही अशा वनस्पतींची विक्री करण्याचा व्यवसाय कमी गुंणतवणूकीत सुरू करू शकता.

याचा व्यवसायात बोन्साय प्लांट ही एक अशी वनस्पती आहे, जी आजकाल लोकांसाठी गुडलक मानली जाते. त्यामुळे या बोन्सायच्या प्लांटच्या लागवडीद्वारे तुम्ही चांगली कमाईसुद्धा करू शकता. कारण या प्लांटचा उपयोग सजावटी सोबत ज्योतिष (astrology) आणि वास्तुशास्त्रासाठीही  (architecture) केला जातो. या प्लांटच्या लागवडीसाठी केंद्र सरकार आर्थिक मदतही देखील करते. साधारणपणे  20 हजार रुपयांमध्‍येही तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.  

तुमच्‍या गरजेनुसार लहान किंवा मोठ्या स्तरावर हा व्यवसाय सुरू करता येईल. यानंतर विक्री वाढल्याने तुमचा नफा वाढेल आणि तुम्ही हा व्यवसाय आणखी वाढवू शकता. हा व्यवसाय दोन प्रकारे करता येतो. एक म्हणजे, तुम्ही खूप कमी पैसे गुंतवून हा व्यवसाय तुमच्या घरी सुरू करू शकता. पण त्यामधून उत्पन्न सुरू होण्यास थोडा वेळ लागेल. कारण बोन्साय प्लांट तयार होण्यासाठी किमान दोन ते पाच वर्षे लागतात. या व्यतिरिक्त तुम्ही रोपवाटिकेतून तयार रोपे आणून 30 ते 50 टक्के नफा ठेऊन विकू शकता.

आजकाल ही वनस्पती गूडलक वनस्पती म्हणून खूप वापरली जाते. घर आणि ऑफिसच्या सजावटीसाठीही याचा वापर होतो. त्यामुळे आजकाल या वनस्पतीची मागणी खूप जास्त आहे. बाजारात या रोपांची किंमत 200 रुपयांपासून ते 2500 रुपयांच्या आसपास आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला स्वच्छ पाणी, वालुकामय माती किंवा वाळू, भांडी आणि काचेची भांडी, जमीन किंवा छप्पर, 100 ते 150 चौरस फूट स्वच्छ खडे किंवा काचेच्या गोटया, पातळ तार, झाडांवर पाणी शिंपडण्यासाठी स्प्रे बाटली, शेड बनवण्यासाठी जाळी आवश्यक आहे. तुम्ही हा व्यवसाय छोट्या स्तरावर सुरू केला, तर सुमारे १० हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.  

तुम्हाला हा व्यवसाय करताना तीन वर्षांत प्रतिरोप सरासरी 240 रुपये खर्च येईल, त्यापैकी 120 रुपये प्रतिरोपाला सरकारी मदत मिळेल. ईशान्य भारतातील राज्यांव्यतिरिक्त बोन्साय प्लांट लागवडीसाठी येणाऱ्या खर्चाच्या 50 टक्के अनुदान सरकार देते. याचाच अर्थ शेतकऱ्याचा एकूण गुंतवणुकीत 50 टक्के खर्च होता. सरकारकडून देण्यात येणाऱ्या  50 टक्के अनुदानापैकी 60 टक्के केंद्राचा आणि 40 टक्के राज्याचा वाटा असतो. तर ईशान्य राज्यांमध्ये या प्लांटच्या लागवडीसाठी 60 टक्के सरकार अनुदान देते. या 60 टक्क्यांमध्ये  90 टक्के केंद्राचा आणि 10 टक्के राज्य सरकारचा वाटा असतो. याबाबत जिल्ह्यातील नोडल अधिकाऱ्याकडे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल.

जर तुम्ही हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करणार असाल तर एक हेक्टरमध्ये 1500 ते 2500 रोपे लावता येतात. जर तुम्ही 3 बाय  2.5 मीटरवर एक रोप लावले तर एका हेक्टरमध्ये सुमारे 1500 रोपे लावली जातील. दोन रोपांच्या मध्ये सोडलेल्या जागेत तुम्ही दुसरे पीक घेऊ शकता. बोन्साय प्लांट लागवडीतून 4 वर्षांनंतर 3 ते 3.5 लाख रुपये मिळू लागतील. दरवर्षी रिप्लांटेशन करण्याची गरज नाही. कारण बांबूची झाडे सुमारे 40 वर्षे टिकतात. इतर पिकांसह शेताच्या बांधावर 4 बाय 4 मीटर अंतरावर बांबू लावल्यास चौथ्या वर्षापासून एक हेक्टरमधून सुमारे 30 हजार रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. याच्या लागवडीतून शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतात.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने