प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर हिची आत्महत्या

 


गेल्या काही दिवसांपासून फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीमधून एकामागून एक सेलिब्रिटींच्या मृत्यूच्या बातम्या येत आहेत. त्याचवेळी टीव्ही इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने आत्महत्या केली आहे. अभिनेत्रीने इंदूरमधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अभिनेत्रीची सुसाईड नोटही सापडली आहे असे समजते. वैशाली ठक्कर हीने प्रसिद्ध शो ये रिश्ता क्या कहलाता है मध्ये संजनाची भूमिका साकारली आहे. तिला या शोमधून त्याला बरीच ओळखही मिळाली. या शोनंतर ती ये वादा रहा, ये है आशिकी, ससुराल सिमर का, सुपर सिस्टर, लाल इश्क आणि विष आणि अमृतमध्ये दिसली.

वैशाली ठक्कर ही मूळची इंदौरची असून, ती एका व्यापारी कुटुंबातील आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात अँकरिंगपासून केली. 2015 मध्ये, तिला स्टार प्लस शो ये रिश्ता क्या कहलाता है मध्ये संजनाची भूमिका करण्याची संधी मिळाली. या टेलिव्हिजन शोमधून तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या शोनंतर ती ये वाद रहा, ये है आशिकी, ससुराल सिमर का, सुपर सिस्टर, लाल इश्क आणि विष और अमृतमध्ये दिसली.

ससुराल सिमर का मधील अंजली भारद्वाज ही वैशालीची सर्वात लोकप्रिय भूमिका होती. ज्यासाठी तिला गोल्डन पेटल अवॉर्ड्समधील नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे. 2019 मध्ये, वैशाली टीव्ही शो मनमोहिनीमध्ये दिसली. ज्यामध्ये तीने मानसीची भूमिका साकारली आहे. वैशालीने टेलिव्हिजनशिवाय चित्रपटांमध्येही काम केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने