बल्लारपूर रेल्वेस्थानक दुर्घटनेतील मृत महिलेच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत

 


चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे रेल्वेस्थानकात झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. पादचारी पुलाचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नीलिमा रंगारी यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपये अर्थसहाय्य देण्याचीही घोषणा आज केली आहे.

याशिवाय जे जखमी झाले असतील त्यांच्यावर योग्य ते उपचार शासकीय खर्चाने करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. महाराष्ट्रातील चंद्रपूर काल जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली होती. बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील फूट ओव्हर ब्रिजचा काही भाग कोसळला. या अपघातात फूटओव्हर ब्रिजवर उपस्थित असलेले लोक 60 फूट उंचीवरून रुळांवर पडले. या अपघातात 20 जण जखमी झाले असून त्यापैकी 1 जणांचा मृत्यु झाला होता

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने