ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती गंभीर, निधन झाल्याचे वृत्त चुकीचे ?

 


विक्रम गोखले यांना गेल्या काही दिवसांपासून मधुमेहाचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही माध्यमांनी रात्री उशिरा त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे. परंतु आता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे ANI या वृत्तसंस्थेने पहाटे ३ वाजून ११ मिनिटांनी याबाबत अधिकृत ट्विट करून लिहले आहे 'ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती गंभीर असून ते लाइफ सपोर्टवर आहेत त्यांचे अद्याप निधन झालेले नाही. त्याच्यासाठी प्रार्थना करत राहा,' अशी माहिती विक्रम गोखले यांची मुलीने दिली आहे.  या आधी रात्री उशिरा महाराष्ट्र सरकारच्या माहिती कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन विक्रम गोखलेंच्या निधनासंदर्भातील ट्वीट मध्यरात्री १२ वाजून ८ मिनिटांनी करण्यात आलं आहे. परंतु ANI या वृत्तसंस्थेच्या अपडेट नुसार त्यांची तब्येत क्रिटिकल असून त्यांचे निधन झालेले नाही (Veteran Actor Vikram Gokhale is still critical).  

विक्रम गोखले यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९४७ रोजी झाला असून त्यांनी चित्रपट मालिका आणि नाटक या सर्व व्यासपीठावर काम केले आहे. त्यांनी मराठी सिनेसृष्टीबरोबरच अनेक हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. सध्या ते स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत भूमिका साकारत आहे. त्यांनी ‘अग्निहोत्र’ माहिलेकत त्यांनी साकारलेली मोरेश्वर अग्निहोत्री ही भूमिका चांगली गाजली होती. अभिनयासोबतच विक्रम गोखलेंनी लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही काम करत आहेत. विक्रम गोखले यांनी २०१० मध्ये ‘आघात’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटाचं समीक्षकांनी विशेष कौतुक केलं होतं. त्यानंतर २०१३ मध्ये त्यांना‘अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.

विक्रम गोखले यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘गोदावरी’ हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांनी जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे या कलाकारांबरोबर भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या शूटिंगच्या आधीही ते रुग्णालयात दाखल होते. डिस्चार्ज मिळताच त्यांनी शूटिंगला सुरुवात केली होती. विक्रम गोखले यांना गेल्या काही काळापासून घशाच्या त्रासाने त्रस्त होते. यामुळे त्यांनी नाटकातून संन्यास घेतला होता. सध्या ते नवोदित कलावंतांना अभिनयाचं प्रशिक्षण देण्याचंही काम करत होते.

विक्रम गोखले यांना २०१३ मध्ये अनुमती’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार (इरफान खान यांच्याबरोबर विभागून) मिळाला असून, त्यांना   २०१५ मध्ये विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. तसेच २०१७ मध्ये हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार, २०१८ मध्ये पुलोत्सव सन्मानाने गौरवण्यात आले आहे. तसेच काही वर्षांपूर्वी त्यांना चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने