T20 World Cup 2022 : भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार लढत, काय सांगते आकडेवारी

 


T20 विश्वचषक 2022 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत आज, गुरुवार, 10 नोव्हेंबर रोजी अॅडलेड ओव्हल येथे भारत आणि इंग्लंड एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. भारताने सुपर 12 मध्ये चार सामने जिंकले आणि गट 2 मध्ये अव्वल स्थान मिळवले. मात्र, पर्थमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून संघाला पराभवाचा सामना करावा लागला. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव हे भारतासाठी आतापर्यंतचे सर्वात यशस्वी फलंदाज ठरले असून त्यांच्याकडून उपांत्य फेरीत संघाला मोठी खेळी खेळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे यांचा इंग्लंडलाही मोठा धोका असेल.

इंग्लंडबद्दल सांगायचे तर, शेवटच्या सुपर 12 सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात यशस्वी झाला. इंग्लंडला आयर्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. त्याच बरोबर गेल्या दोन वर्षातील दोन्ही संघांचे रेकॉर्ड बघितले तर या बाबतीत टीम इंडिया इंग्लिश संघापेक्षा सरस दिसते. इंग्लंडविरुद्ध भारताचे फलंदाजच नव्हे तर गोलंदाजही यशस्वी कामगिरी करत आहेत. 

भारत विरुद्ध इंग्लंड T20 सामन्यात सर्वात जलद शतकाचा विक्रम सूर्यकुमार यादवच्या नावावर आहे, ज्याने जुलै 2022 मध्ये 48 चेंडूत शतक झळकावले होते. या सामन्यात 117 धावा झाल्या. उभय देशांमधील टी-२० क्रिकेटमधील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. सूर्याचा स्ट्राइकरेट 195 पेक्षा जास्त आहे आणि हा दोन्ही देशांमधील सर्वोत्तम स्ट्राइकरेट आहे. मार्च 2021 मध्ये पदार्पण केल्यापासून त्याने इंग्लंडविरुद्ध 224 धावा केल्या आहेत. या कालावधीतील एकाच फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

इंग्लंडविरुद्धही विराट कोहलीची बॅट देखील तळपते. मार्च २०२१ पासून त्याने या संघाविरुद्ध ४ अर्धशतके झळकावली आहेत. याच मालिकेत विराटने इंग्लंडविरुद्ध 231 धावा केल्या, जो एक विक्रम आहे. मात्र, दोन्ही देशांदरम्यान खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेत ख्रिस जॉर्डनने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 18 विकेट घेतल्या आहेत. सर्वाधिक भागीदारी (१३० धावा) जोस बटलर आणि डेव्हिड मलान यांनी केली आहे. इंग्लिश संघाने सर्वाधिक (20) अतिरिक्त धावाही दिल्या आहेत. भारताने या संघाविरुद्ध गेल्या 8 पैकी 5 सामने जिंकले आहेत आणि दोन्ही शेवटच्या मालिकाही भारताने जिंकल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने