Ashish Shelar : हा महाराष्ट्रद्रोह नाही का? आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंनाच विचारणा



ब्युरो टीम : 'प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण यांचा अपमान, संत ज्ञानेश्वरांची खिल्ली, संत एकनाथ यांची चेष्टा, वारकरी संप्रदायाचा अपमान हा महाराष्ट्रद्रोह नाही का?,' अशी थेट विचारणाच  भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) उद्धव ठाकरेंना केली आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांना केलेल्या वक्तव्यांमुळे सध्या वाद निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा मुंबईत ‘माफी मांगो’ आंदोलन करणार आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत यासंबंधी माहिती देताना संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्यासह उद्धव ठाकरेंनाही लक्ष्य केलं.

'बाबासाहेबांचा जन्म कुठे झाला यावर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या वतीने सुरु आहे. तो जाणीवपूर्वक सुरु असून, त्यामागील कारणं अस्पष्ट आहेत. एखादं संकट आल्यावर शेतकऱ्याला ते अस्मानी आहे की सुलतानी असा प्रश्न पडतो. तसा आंबेडकरप्रेमी, समस्त भारतीय नागरिकांवर आंबेडकरांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करत अफगाणी संकट आणलं आहे,' अशी टीकाही शेलार यांनी केली.

'हिंदू देव-देवतांचा अपमान करणं, हिंदू मानाला इजा पोहोचवणारी वक्तव्यं समोर आल्यानंतर उद्धव ठाकरे तुम्ही मौन सोडायला तयार नाही. उद्या कसले डोंबलाचे मोर्चे काढत आहात,' अशी टीकाही यावेळी शेलार यांनी केली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने