Love Jihad : कोरोना प्रमाणे भारतात लव्ह जिहादचा व्हायरस आलाय, काजल दीदी हिंदुस्तानी आक्रमक



ब्युरो टीम : 'जसा कोरोना आला त्याच पद्धतीने लव्ह जिहाद हा व्हायरस आला आहे, तो आता हिंदुस्तानमध्ये शिरला असून त्याचा बंदोबस्त करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. हे आता हिंदूंनी लक्षात ठेवावं,' असा घणाघात काजल दीदी हिंदुस्तानी यावेळी केला.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण व दिवसेंदिवस लव्ह जिहादचे प्रकार वाढत चालल्यामुळे याच्या निषेधार्थ आज नगर शहरांमध्ये सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. काजल हिंदुस्तानी व कालीचरण महाराज हे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. याप्रसंगी काजल हिंदुस्तानी म्हणाल्या, 'दिल्लीमध्ये श्रद्धाचे 32 तुकडे झाले. आसाममध्ये सुद्धा चार दिवसापूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला ठार मारले. अशा घटना आता दिवसेंदिवस घडत चालल्या आहेत. म्हणून आता आपल्याला मुलींना तलवार हाती द्यावी लागेल, जिहादी वृत्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्यामुळे परिस्थिती अवघड होत चाललेली आहे .जर तिला तलवार दिली, तर ती तिचे संरक्षण करू शकेल. झाशीची राणी लक्ष्मीबाई, जिजाऊ अशा त्या घडल्या पाहिजे,' असे त्या म्हणाल्या. 'घरामध्ये आपण आपल्या पाल्यांना चांगले संस्कार दिले पाहिजे ,जेणेकरून या संस्कारतून चांगली पिढी ही घडली जाईल,' असे त्या म्हणाल्या. 'आज देशामध्ये षडयंत्र रचले जात आहे. 13 वर्षीय मुलींवर त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून अडकवले जात आहे. हिंदूंनी जात  बघण्यापेक्षा फक्त हिंदू म्हणूनच आपण मुलींचे रक्षण करणे आता गरजेचे आहे,' असेही त्या म्हणाल्या. 'आज सिनेमा, म्हणजेच फिल्म इंडस्ट्रीज, ड्रग्स, सोशल मीडिया या माध्यमातून  लव्ह ए जिहाद झालेले आहेत, अशा या कारणामुळेच ही पिढी आता बरबाद झाली आहे, त्यासाठी आता सामाजिक आर्थिक बहिष्कार टाकण्याची गरज निर्माण झाली आहे, असेही त्या म्हणाल्या. 

कालीचरण महाराज म्हणाले की, ' मुलींना बदनाम करण्याचे षड्यंत्र केले असले जात आहे.  आता हिंदूंनी एकत्रितपणे येऊन या जिहादी प्रवृत्तीला कशा पद्धतीने रोखता येईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आज लव्ह जिहाद च्या घटना वाढत चाललेल्या आहेत, असेही ते म्हणाले.

यावेळी दिगंबर गेंट्याल ,बापूसाहेब ठाणगे ,युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, सुरेंद्र गांधी, शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर सुरेखा कदम, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आशा निंबाळकर, माजी महापौर अभिषेक कळमकर व भगवान फुलसौंदर, नगरसेवक गणेश कवडे, भाजपाचे अभय आगरकर ,सागर ठोंबरे, नितीन गंगेकर, देविदास मुदगल, सचिन पळशीकर ,अभिमन्यू जाधव, रुद्रेश अंबाडे आदी यावेळी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने