Nitin Gadkari : गडकरी है तो मुमकिन है! महामार्गांवर अनियंत्रीतपणे धावणाऱ्या गाड्यांना लागणार 'ब्रेक'



ब्युरो टीम : आता महामार्गांवर हव्या त्या वेगाने वाहन चालवताच येणार नाही. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तसे संकेत दिले आहे. आज, बुधवारी ते राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना त्यांनीन याबाबत माहिती दिली. 

महामार्गावरील वाहनांच्या नवीन वेगमर्यादेबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. गडकरी यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला ही माहिती दिली आहे. महामार्गांवर होणाऱ्या अपघातांच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार सातत्यानं पावलं उचलत असून लोकांमध्ये जनजागृती करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच या कामासाठी सेलिब्रिटींचेही सहकार्य घेतले जात आहे, असेही गडकरी म्हणाले.

तसेच आंतरराष्ट्रीय नियमांच्या आधारे आणि राज्य सरकारांना विश्वासात घेऊन दुपदरी आणि चौपदरीसह विविध महामार्गांवरील नवीन वेगमर्यादा लवकरच ठरवली जाईल, असे ते म्हणाले. देशभरात महामार्गांवर दरवर्षी पाच लाख अपघात होत असतात. हे पाहता रस्ते अपघातांच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर असल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. या अपघातांमध्ये जितके लोक मरतात तितके लोक कोणत्याही साथीच्या रोगात, मारामारीत किंवा दंगलीत मरत नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने