Rohit Pawar : सीमाप्रश्नावरून रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका, म्हणाले...



ब्युरो टीम : 'वैयक्तीक बदला घेण्यासाठी सरकार पाडताना दाखवली तशी कलाकारी सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडताना का दाखवली जात नाही?' असा थेट प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे सरकारवर टीकास्र सोडले. तसेच रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं, तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही? असा प्रश्नही रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं आहे. अशात बेळगावजवळील हिरेबागवाडी येथे महाराष्ट्रातील वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला केलाय. यावरून विरोधकांकडून शिंदे सरकारवर टीका करण्यात येत आहे.  आमदार रोहित पवार यांनीही या मुद्द्यावरून शिंदे सरकारवर तोफ डागली.

याबाबत रोहित पवार यांनी ट्विट केले असून त्यात म्हंटले आहे की, 'महाराष्ट्राच्या अस्मितेशी छेडछाड होत असताना बघू…करू… केंद्राशी बोलू…ही मुळमुळीत भाषा कशासाठी? कर्नाटकच्या आगामी निवडणुकांसाठी महाराष्ट्राशी गद्दारी करणं बरं नाही.

<blockquote class="twitter-tweet"><p lang="mr" dir="ltr">वैयक्तीक बदला घेण्यासाठी सरकार पाडताना दाखवली तशी <a href="https://twitter.com/hashtag/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw">#कलाकारी</a> सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडताना का दाखवली जात नाही? पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही?</p>&mdash; Rohit Pawar (@RRPSpeaks) <a href="https://twitter.com/RRPSpeaks/status/1600352209929060353?ref_src=twsrc%5Etfw">December 7, 2022</a></blockquote> <script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>

तसेच मंत्र्यांचा बेळगाव दौरा रद्द झाल्यावरून रोहित पवारांनी सरकारवर खोचक शब्दात टीका केली. 'पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं, तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही?” असेही ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने