Sanjay Raut : 'लो कर लो बात…' म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांची संजय राऊतांवर टीका



ब्युरो टीम : शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाला होता, असं म्हटल्याचं समोर आलं आहे. यावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीटद्वारे संजय राऊतांना टोला लगावला आहे.

https://twitter.com/ChitraKWagh/status/1603353477895573504?t=4SwFvUPGBI_wgEJ1H-JZyg&s=19

चित्रा वाघ यांनी संजय राऊतांच्या विधानाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत, “लो कर लो बात…सर्वज्ञानी संजय राऊत म्हणत आहेत, बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला. अहो…महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू येथे झाला आहे. तर हे असं आहे सर्वज्ञानी यांचं अगाध ज्ञान,' असा जोरदार टोला संजय राऊतांना लगावला आहे.

https://twitter.com/ChitraKWagh/status/1603371992518131713?t=BycIWxPV8ouRdaVhybIxSA&s=19

'रोज सकाळी महाराष्ट्राला ज्ञान देणारे सर्वज्ञानी इतके अज्ञानी असतील, याचं दर्शन आज महाराष्ट्राला झालं आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात नाही, मध्य प्रदेशमधील महू येथे झाला आहे. इतकं सामान्य ज्ञान असू नये? आमचे आदर्श असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीची माहिती देऊन तुम्ही काय मिळवता आहात?, असं म्हणतानाच चित्रा वाघ पुढे म्हणाल्या,'अशा पद्धतीने राष्ट्रपुरुषांचा अपमान तुम्ही करायचा आणि मोर्चेपण तुम्ही स्वत:च काढायचे, मूर्ख समजू नका महाराष्ट्र तुम्हाला पुरता ओळखून आहे, तुमचा जाहीर निषेध.” असंही वाघ यांनी ट्विटरवरील व्हिडीओत म्हटलं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने