Mazi Tuzi Reshimgath : रेशीमगाठ तुटणार नाही! प्रार्थना बेहरे-श्रेयस तळपदेने चाहत्यांना दिली महत्वाची न्यूज



ब्युरो टीम :  ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही झी मराठी वरील मालिका आज प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. यात प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे यांनी प्रमुख भूमिका साकारली. त्यांनी साकारलेल्या यश आणि नेहा या पात्रांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली.  यश आणि नेहा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार नसल्याने त्यांचे चाहते निराश झाले होते. पण आता ही जोडी नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं प्रार्थना आणि श्रेयस यांनी एक पोस्ट शेअर करत सांगितलं आहे.

प्रार्थना आणि श्रेयस यांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. यात मालिकेचा शेवटचा सीन शूट झाल्यानंतर सर्वांनी केलेला जल्लोष आहे. या  व्हिडीओला  त्यांनी कॅप्शन लिहिलं आहे की, 'शो संपतोय…..आपलं नात नाही…आपली ही रेशीमगाठ अशीच कायम राहणार आहे…वर्षानुवर्ष…कारण आम्ही लवकरच काहीतरी नवीन घेवुन येऊ…फक्त तुमच्यासाठी…आणि म्हणूनच कोणीतरी म्हंटलय… *Picture* अभी बाकी है मेरे दोस्त…कुछ समझे?'

https://www.instagram.com/reel/CntYCGIPMd5/?igshid=YmMyMTA2M2Y=

त्यामुळे आता मालिकेनंतर हीच लोकप्रिय जोडी आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे हे निश्चित झालं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने