Ajit Pawar : ‘पहाटेच्या शपथविधी’वर फडणवीसांचा गौप्यस्फोट, आता अजित पवारांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष



 ब्युरो टीम : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासोबत घेतलेल्या ‘पहाटेच्या शपथे’वर महत्त्वाचे भाष्य केले आहे. फडणवीसांनी केलेल्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. आता अजित पवार यावर काय प्रतिक्रिया देतात?  याकडे महाराष्ट्रसह देशाच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले आहे.

‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या  ‘टीव्ही 9 मराठी’च्या  कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधी बाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर चर्चा करत होते. तेव्हा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली होती की, आम्हाला स्थिर सरकार हवं आहे. त्यानंतर शरद पवार यांच्याशी चर्चा होत, काही गोष्टी ठरल्या होत्या. पण, ठरल्यानंतर त्या कशा बदलल्या, हे सर्वांनी पाहिलं आहे,' असे फडणवीस यांनी म्हंटल आहे.

फडणवीसांनी हे विधान केल्यानंतर त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत आणि सभ्य व्यक्ती आहेत. असत्याचा आधार घेऊन अशा प्रकारची विधानं ते करतील, वाटलं नव्हतं, असे शरद पवार म्हणाले आहेत.तसेच काँग्रेसचे नेत अशोक चव्हाण यांनीदेखील फडणवीस यांनी केलेल्या विधनावर प्रतिक्रिया दिली आहे.निवडणुकीच्या तोंडावर संभ्रम निर्माण करणे हाच फडणवीसांच्या विधानाचा हेतू आहे, असेही अशोक चव्हाण म्हणाले आहेत.फडणवीसांच्या या विधानावर आता अजित पवार काय प्रतिक्रिया देणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने