Cricket :भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय



ब्युरो टीम : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दिल्लीत सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवलाय. गावस्कर बॉर्डर ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर सहा विकेट्सनं विजय मिळवला आहे. दिल्ली कसोटी जिंकत भारतानं सिरिजमधे 2-0 नं आघाडी घेतली आहे. हा भारतीय संघाचा ऐतिहासीक विजय आहे. कारण गेल्या 63 वर्षांपासून दिल्लीत टीम इंडियावर मात करणं कांगारूंना शक्य झालेलं नाही. रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा हे या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. 

दिल्ली कसोटीत रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा या दोन गोलंदाजांनी भन्नाट कामगिरी केली आहे. या दोघांच्या फिरकीच्या जादूपुढे ऑस्ट्रेलियाचा संघ गारद झाला. भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव अवघ्या 113 धावांवर रोखला होता. या दुसऱ्या डावात रवींद्र जडेजाने 42 धावांत 7 बळी घेतले होते. तर अश्विनने 59 धावांत 3 बळी घेतले होते.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने