radhakrusha vikhe patil ; १५ मार्च पासून राज्यात तलाठी भरती प्रक्रिया सुरु होणार; वाळू लिलाव निविदाचा अंतिम मसुदा कॅबिनेटमध्ये मांडणार - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

 



ब्युरो टीम: अहमदनगरमधील लोणी येथे झालेल्या महसूल परिषदेत बोलताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी १५ मार्च पासून राज्यातील भरती प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती तसेच  लवकरच वाळू लिलाव निविदाचा अंतिम मसुदा कॅबिनेटमध्ये मांडणार असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली.

अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे दोन दिवसीय महसूल परिषद संपन्न झाली आहे. या परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांनीही उपस्थिती लावली. दोन दिवस चाललेल्या या महसूल परिषदेत अनेक धोरण निश्चित करण्यात आली असून या धोरणांपैकी वाळू लिलावाचे महत्त्वाचे धोरणाचा अंतिम मसुदा तयार झाला आहे. लवकरच ते कॅबिनेटमध्ये मांडणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. प्रथमच अशी परिषद यशदाच्या बाहेर ग्रामीण भागात घेण्यात आली आणि यापुढे सुद्धा पुण्याच्या बाहेर परिषद घेण्याचा मानस महसूलमंत्र्यांनी व्यक्त केला.

 

महसूल परिषदेत कोणत्या गोष्टींवर झाली चर्चा?

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग रस्ते प्रकल्पाबाबत भूसंपादनात येणाऱ्या अडथळ्याबाबत चर्चा झाली आहे. तसेच वाळू धोरणाबद्दल चर्चा झाली. शाळा प्रवेशासाठी विविध दाखले लागतात त्यात सुलभता येणार. ते म्हणाले की, सौर उर्जा हा देखील महत्वाचा विषय आहे. लवकरच शेतकऱ्यांना सलग 12 तास वीज देता येणार. पुढील 6 महिन्यात बांध, शिवरस्ते याबाबत मिशन मोडवर काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने