Sharad pawar: पहाटेच्या शपथविधी बद्दल मनसे नेत्यांचे महत्वाचे विधान..... म्हणून शरद पवार ने......

 


ब्युरो टीम : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ साली स्थापन झालेल्या ७२ तासांच्या सरकारबाबत केलेल्या विधानामुळे वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करुनच अजित पवार आणि मी सरकार स्थापन केलं होतं, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसचे नेते प्रकाश महाजन यांनीही याप्रकरणावर भाष्य करत टोलेबाजी केली आहे.

एबीपी माझाशी बोलताना प्रकाश महाजन म्हणाले की, “शरद पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर ४५ मिनिट बैठक झाली होती. शरद पवारांना अंधारात ठेऊन अजित पवार देवेंद्र फडणवीसांबरोबर शपथ घेतात, हे न पचण्यासारखं आणि न पटण्यासारखं आहे. अजित पवार शरद पवारांना न विचारता करतील, यावर कोणाही विश्वास ठेवणार नाही. ही घटना घडल्यानंतर शरद पवारांना वाटलं असेल, मी पावसात भिजून कमवलेले, या घटनेने जाऊ शकतं. म्हणून अजित पवारांना माघारी बोलवलं,” असा टोला प्रकाश महाजनांनी लगावला आहे.

गद्दार पुन्हा निवडून येणार नाही, असं अजित पवार पिंपरीत बोलताना म्हणाले. याचाही प्रकाश महाजन यांनी समाचार घेताल. “अजित पवारांनी शरद पवारांना न विचारता देवेंद्र फडणवीसांबरोबर शपथ घेतली, तर ते गद्दार आहेत. अजित पवार खरच गद्दार असते, तर शरद पवारांनी त्यांना माफी देऊन उपमुख्यमंत्री केलं नसतं.”

देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत आणि सभ्य व्यक्ती आहेत, असं विधान शरद पवारांनी केलं होतं. यावर बोलताना प्रकाश महाजनांनी म्हटलं, “याचा अर्थ याच्यामागे काहीतरी घडलं. ते घडलेलं सत्य जगासमोर येऊन नये, किंवा दोन व्यक्तीत झालेल्या गोष्टी कालांतराने पुढं आणणं योग्य नाही. असं शरद पवारांना सूचवायचं होतं.”

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने