HSC : मोठी बातमी ! बारावी पेपर फुटीप्रकरणी नगरमधून पाच जणांना घेतले ताब्यात

 


विक्रम बनकर, नगर : बारावीच्या पेपरफुटी प्रकरणाचे धागे आता अहमदनगर जिल्ह्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबईच्या पोलीस पथकाने काल रात्री अहमदनगर जिल्ह्यात रुईछत्तीशी या गावात मोठी कारवाई केली आहे. तेथून एका मुख्याध्यापकासह ५ जणांना पोलिसांनी अटक केली. 

१२ वीची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी मुंबईत दादर येथील अँटॉनिओ डिसिल्वा हायस्कूलमधील शिक्षिकेने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिथे हा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा तपास करताना पोलिसांना याचे धागेदोरे अहमदनगरच्या रूईछत्तीशी गावातही असल्याचे आढळून आले. इथे परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्याचे फोटो काढून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाठवण्यात आले. फोडलेल्या या प्रश्नपत्रिकेची प्रत्येकी १० हजार रुपयांना विक्री करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती त्यानुसार नगर येथे कारवाई करण्यात आली आहे. 

मुंबईच्या या पथकाने नगर तालुक्यातील रूईछत्तीशी गावात आले. तेथून मुख्याधापकासह दोन शिक्षक, एक चालक आणि एका मुलीला अटक केलीय.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने