Maharashtra Rain : राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस, शेतपिकांचे मोठं नुकसान



ब्युरो टीम : पुढील काही दिवस राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. हा अंदाज खरा ठरला असून काल रात्री पुणे, मुंबईसह उपनगरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर, आज सकाळी अहमदनगर, कल्याण डोंबिवली, जळगाव, नाशिक तसेच अमरावतीसह विदर्भातील काही भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.  शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.  या पावसामुळे आंब्यासह इतर रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. बहुतांश भागात गारपीट झाल्याने कापसांच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने