Mohan Bhagwat : भारतीय शिक्षण व्यवस्थेबाबत RSS सरसंघचालकांचे मोठं वक्तव्य, म्हणाले...



ब्युरो टीम : हरयाणातील उंड्री-कर्नाल रोडवरील रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेबाबत मोठ वक्तव्य केलं आहे. 'ब्रिटीश भारतात येण्यापूर्वी ७० टक्के लोकसंख्या शिक्षित होती. तेव्हा बेरोजगारीही कमी होती,' असं ते म्हणाले.

'भारताची शिक्षण व्यवस्था केवळ रोजगारासाठी नव्हे, तर ज्ञानाचेही माध्यम होती. सर्वांना स्वस्त दरात शिक्षण उपलब्ध होते. त्यामुळे शिक्षणाचा सर्व खर्च समाजाने उचलला. या शिक्षणातून पुढे आलेले अनेक कलाकार, विद्वान मंडळी जगभर ओळखले गेले,' असेही मोहन भागवत म्हणाले.  'ब्रिटीश राजवटीपूर्वी देशातील ७० टक्के लोकसंख्या शिक्षित होती. तसेच, बेरोजगारीही नव्हती. तर, इंग्लंडमध्ये फक्त १७ टक्के लोक शिक्षित होती. पण, ब्रिटीशांनी त्यांची शिक्षण पद्धती भारतात आणि आपली त्यांच्या देशात लागू केली. त्यामुळे ब्रिटीश ७० टक्के आणि आम्ही १७ टक्के शिक्षित झालो,' असे वक्तव्यही भागवत यांनी केलं.

'सर्वांसाठी वैद्यकीय उपचार आणि शिक्षण ही देशासाठी महत्वाची गोष्ट आहे. कारण, वैद्यकीय उपचार आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी महाग होत चालल्या आहेत. म्हणून सर्वसामान्य नागरिकाला स्वस्त दरात वैद्यकीय उपचार आणि शिक्षण मिळण्याची गरज आहे,' असेही मतही भागवत यांनी मांडले.

पहा व्हिडीओ



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने