ब्युरो टीम : एका प्रत्रकार परिषदेत “भाजपाने लिहून दिलेली स्क्रीप्ट मुख्यमंत्र्यांनी वाचली आहे. देवेंद्र फडणवीस
यांनी इशारा केल्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी कागद वाचला. याचा अर्थ लिहून दिलेली
स्क्रीप्ट वाचली. सावरकरांची यात्रा काढणार असेल स्वागत आहे. पण, सावरकांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी सातत्याने महाराष्ट्रात करण्यात येत
आहे.
केंद्रात ८ वर्षापासून भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे सर्वात आधी सावरकरांना
भारतरत्न द्या. मग विचारधारा यात्रा काढावी, ” असं आवाहन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी
भाजपा-शिंदे सरकारला दिलं आहे.
टिप्पणी पोस्ट करा