ब्युरो टीम: नागपूर येथे
भाजपने सहा विधानसभा क्षेत्रात सावरकर गौरव यात्रेचे आयोजन केले आहे. यातील शंकर
नगर येथील सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.
केंद्रीय मंत्री नितीन
गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे या सभेला उपस्थित
होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा तुम्ही कितीही विरोध केला तरीही प्रत्येक
नागरिक रस्त्यावर येऊन म्हणेल, होय मीच सावरकर आहे, मीच सावरकर आहे
असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.
टिप्पणी पोस्ट करा