Rohit Pawar : धिरेंद्र शास्त्रींचे शिर्डीच्या साईबाबांवर वादग्रस्त वक्तव्य, रोहित पवारांनी भाजपला सुनावले



ब्युरो टीम :  बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन नव्या वादाला तोंड फोडले आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी बागेश्वर बाबाला भाजपची फुस असल्याचा आरोप करीत जोरदार टीका केली आहे. ‘हिमत असेल तर भोंदूंच्या आडून ट्रायल घेण्यापेक्षा अधिकृत भूमिका घेण्याते धाडस त्यांनी दाखवावे’, असे आव्हानच रोहित पवार यांनी भाजपला नाव न घेता दिलं आहे.

बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी यांनी शिर्डीच्या साईबाबांच्या देवत्वाविषयी शंका उपस्थित केली. तसेच महात्मा गांधींवरही टीका केली आहे. या संबंधी आमदार पवार यांनी म्हटले आहे, साईबाबा आणि महात्मा गांधी यांच्याबाबत दोन भोंदू बाबांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध. पण यानिमित्ताने महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुका कोणत्या दिशेला नेण्यात येत आहेत, याचा अंदाज येऊ लागला आहे.

आमदार रोहित पवार यांनी म्हंटल आहे की, 'भोंदू बाबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गांधी नष्ट करण्याचे कुणी कितीही प्रयत्न केले तरी ते नष्ट होऊ शकत नाहीत. जगात गांधी विचार अजरामर आहे. पण हे विचार संपवण्याचा एका मोठ्या राजकीय पक्षाचा प्रयत्न आहे. त्यामुळे हिम्मत असेल तर भोंदूंच्या आडून ट्रायल घेण्यापेक्षा अधिकृत भूमिका घेण्याचे धाडस त्यांनी दाखवावं. निवडणुका जवळ आल्या की, तथाकथित बाबा-बुवा या भोंदू लोकांना पुढं करून वादग्रस्त विधानं करायला लावायची, जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद निर्माण करायचा आणि नॉन इश्यूवर चर्चा घडवून मुख्य प्रश्नांवरून लोकांचं लक्ष दुसरीकडं वळवायचं आणि आपली राजकीय भाकरी भाजायची, हे या पक्षाचं पहिल्यापासूनच धोरण राहिलं आहे. पण संतांच्या आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकरांसारख्या महापुरुषांच्या महाराष्ट्राला हा डाव समजत नाही, या भ्रमातून या पक्षाने बाहेर यावं आणि बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था आणि बोकाळलेला भ्रष्टाचार याबाबत लोक विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत,' असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने