विक्रम बनकर, नगर : जगातील
करोड़ो लोकांचे श्रध्दास्थान असणारे श्री साईबाबा यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने
बागेश्वर बाबा यांच्या वक्तव्याचा आम्ही जाहिर
निषेध करतो.साईबाबा हयात असताना त्यांनी आयुष्यभर गोरगरीबांची सेवा
करण्याचे कार्य केले. कधीही कोणचाही द्वेष केला नाही. तसेच त्यांनी जगाला श्रध्दा ,सबुरी व शांततेचा
संदेश दिला त्यांच्याबद्दल असे वक्तव्य महंत पंडित धीरेंद्र शर्मा यांनी बोलणे उचित नाही.
श्री साईबाबांच्या
शिकवणीनुसार अनेक लोक आजही आपल्या जीवनात समाजसेवेचे कार्य करत आहे.साईबाबांना
आदर्श मानून नगरमध्ये सुध्दा श्री
साईद्वारका सेवा ट्रस्ट च्या माध्यमातून हजारो रुग्नाणा मदत मिळवुन देण्याचे कार्य
करीत आहोत.श्री साईबाबांना नाव ठेवणारी अनेक लोक आजपर्यंत आली गेली मात्र श्री
साईबाबांना कोणीही बदनाम करू शकले नाही. धीरेंद्र शास्त्रीनी महाराष्ट्राची संत
परंपरा समजुन घ्यावी व यापुढे साईभक्तांच्या भावना दुखावणारे वक्तव्य करू नये.अशी
मागणी श्री साईद्वारका सेवा (ट्रस्ट) अध्यक्ष ॲड.धनंजय जाधव यांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा