yogi aditynath : योगी सरकारचा मोठा निर्णय; इतिहासाच्या पुस्तकातून 'मुघलां'चे धडे वगळले

 


ब्युरो टीम: उत्तरप्रदेश मधील हिंदुत्ववादी विचारधारेच्या योगी आदित्यनाथ सरकारने नेहमीच राज्यात वेगळे नवीन निर्णय घेतले आहेत. अशातच पुन्हा एकदा मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड यांचा अभ्यासक्रम योगी आदित्यनाथ सरकारने नोठे बदल केले आहेत.

योगी सरकारकडून दोन्ही बोर्डाचे अभ्यासक्रम बदलल्यामुळे आता बारावीच्या विद्यार्थ्यांना यापुढे मुघलांचा इतिहास शिकवला जाणार नाही. भारताचा इतिहास या पुस्तकातून मुघल दरबार हा विषय कमी करण्यात आला आहे. त्याच बरोबर ११ वीच्या पुस्तकातून इस्लामचा उदय, संस्कृतींमध्ये झालेले मतभेद, औद्योगिक क्रांती अशा प्रकारचे सर्वच धडे काढून टाकण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

आगामी २०२३-२४ या वर्षापासून हा बदल करण्यात आला आहे. इतिहासाच्या पुस्तकासोबतच इतर विषयांमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. याआधी बारावीच्या इतिहासाच्या पुस्तकात भारतीय इतिहासामध्ये शासक ते मुघल दरबार हे धडे होते. ही सगळी प्रकरणं आता वगळण्यात आली आहे. तर दुसरीकडे नागरिक शास्त्राच्या पुस्तकातून अमेरिकेचे वर्चस्व आणि शीतयुद्ध हे धडे काढून टाकण्यात आले आहेत.

या निर्णयानंतर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांनी सांगितलं की "आपली संस्कृती हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. नव्या पिढीला आपण हा वारसा काय होता ते शिकवलं पाहिजे. पुरातन काळात लोक कोणत्या संस्कृतीत होते हा विषय शिकवलाच गेला नाही. त्यामुळे आम्ही मुघलांचा इतिहास वगळून त्याऐवजी हा विषय शिकवणार आहोत."

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने