Health: मेंदू तंदुरुस्त ठेवण्यासाठी आहारातील साखर करा; स्मरणशक्तीसाठी ते उत्तम



ब्युरो टीम: वाढत्या वयानुसार स्मृती कमी होणे हे सामान्य आहे, परंतु अधूनमधून विसरणे ही समस्या होते तेव्हा सावध राहणे आवश्यक आहे. अमेरिकन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एजिंगच्या मते, वयानुसार मेंदूत बदल होतात. स्मरणशक्तीशी संबंधित समस्या वाढतात. तथापि, वयानुसार, नवीन गोष्टी शिकण्यासाठी वेळ काढणे किंवा कधीकधी गोष्टी विसरणे ही गंभीर समस्या नाही. अल्झायमर सोसायटीच्या मते, वयाच्या ४० ते ५० व्या वर्षी स्मरणशक्तीशी संबंधित काही लक्षणे दिसू लागतात, उदा. गोष्टी थोड्या लवकर विसरणे, लक्षात ठेवण्यास जास्त वेळ लागणे, सहज विचलित होणे किंवा मल्टिटास्किंगमध्ये अडचण येणे. ही एक सामान्य प्रक्रिया आहे, ती वयानुसार होते.

काळजी करण्याची गरज केव्हा? अपॉइंटमेंट किंवा सामाजिक कार्यक्रम विसरू लागतात, कारच्या किल्ल्यांसारख्या घरगुती वस्तू कुठे ठेवल्या हे विसरू लागले, समवयस्कांपेक्षा योग्य शब्दांचा विचार करण्यास जास्त वेळ लागू लागला, घटना, सूचना किंवा संभाषण लक्षात ठेवण्यात अडचण येत असेल तर सतर्क राहण्याची गरज आहे, असे रेकग्निशन हेल्थचे सीईओ न्यूरोलॉजिस्ट डॉ. एमर मॅकस्विनी म्हणतात

स्मरणशक्ती कशी सुधारावी? हार्वर्ड टीएच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या मते रोजच्या आहारात हिरव्या भाज्या, ग्रीन टी, अक्रोड यांचा समावेश केल्यास मेंदूला आकुंचन होण्यापासून रोखता येते. त्यामध्ये मेंदूसाठी फायदेशीर पॉलीफेनॉल असतात. त्याच वेळी अन्नातील साखरेचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. अतिरिक्त साखर मेंदूमध्ये जळजळ वाढवते, त्यामुळे समन्वय आणि विस्मरणाची समस्या उद्भवते. याशिवाय उच्च रक्तदाबदेखील खूप हानिकारक आहे. उच्च रक्तदाबामुळे मेंदूतील लहान रक्तवाहिन्यांचे नुकसान होते, त्यामुळे स्मरणशक्तीच्या समस्या निर्माण होतात.

मेमरी लाॅस पूर्ववत होऊ शकतो? नेचर मॅगझिननुसार, इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन (विद्युत उत्तेजना) द्वारे ६५ ते ८८ वर्षे वयोगटातील वृद्धांमध्ये कार्यरत आणि दीर्घकालीन स्मरणशक्ती दोन्हीमध्ये सुधारणा झाली आहे. जानकर

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने