Ekadashi एकादशीचा उपवास का करावा, डॉ. नामदेव शास्त्रीनी केला प्रबंध सादर



ब्युरो टीम : वारी हे एक आध्यात्मिक पर्यटन आहे. मनशुद्धी, तनशुद्धी, विचारशुद्धी या हेतूनं ती करावी. ही शुद्धी होत असताना, स्वत:कडंच लक्ष असायला हवं. इतरत्र लक्ष गेल्यास दोषाचं दर्शन होतं. दर्शनातूनच दोष आक्रमण करतात. वर्तमान काळात तरुण मुलं-मुली जे अनुकरण करतात, ते सिनेमा, नाटक, समाजमाध्यम हे पहिल्याचा परिणाम आहे. कपडे असोत वा केशरचना असो, दर्शनच प्रदर्शानाला कारणीभूत आहे. कदाचित एखाद्याला एखादी ‘रचना’ शोभत असेल, कपडे शोभत असतील; परंतु सर्वांच्या देहाला ते योग्य आहेत, असं नाही. कधी कधी पाहणाऱ्या सभ्य डोळ्यांना त्याचा त्रास होतो. तारुण्याला कल्पनविलास फार आवडतो. आपण व्यक्तिविशेष आहोत, या भ्रमातच तारुण्य वाहत जातं. एखाद्या संकाटावर जेव्हा ते आदळतं, तेव्हा बरंच पाणी वाहून गेलेलं असतं. जाग येते, तेव्हा फक्त तो जागा राहतो. कृती करण्याची क्षमता आणि धाडस संपलेलं असतं. काही माणसं मग उदास चेहऱ्यानं, भावनेनं दिंडीत, वारीत फिरताना दिसतात. त्यांना पाहून काही शिकलेले यांनाच वारकरी समजतात. काही पाया पडतात, तर काही चेहरा पाहतात.

वैचारिक परिवर्तनासाठी वारी हे आध्यात्मिक पर्यटन आहे. घरात रोज तीच माणसं, तेच विचार सातत्यानं चालू असतात. अवतीभोवती एकाच विचाराचा वारा वाहत असतो. नवीन दिशा देणारे भेटत नसतात. शेवटी माणूस कंटाळतो. सुंदर जीवन कंटाळवाणं होत जातं. कुठं तरी जाऊन पुन्हा व्यसनी होण्यापेक्षा, विचार परिवर्तन करणाऱ्या अध्यात्मात यायला हवं. सत्य शोधा, तर्क करा, अनुभवाच्या कसोटीवर तोला; मग बोला! यासाठी काही दिवस तर द्यावे लागतील ना? ते दिवस आध्यात्मिक प्रवासात घालवले पहिजेत. त्यालाच ‘दिंडी’ असं म्हणतात. व्यापक ऊर्जेचं स्मरण करीत, त्याचं नाम घेत; माऊली म्हणतात ‘रामकृष्ण पंथ क्रमियेला.’ हे क्रमण दोषांच्या आक्रमणापासून आपलं संरक्षण करतं. यात आपलंच कल्याण आहे. आपल्यात येणारी निर्दोषता ही मानसन्मानाला कारणीभूत असते. तरुण मुला-मुलींची सन्मान मिळविण्याची पद्धत पाहिली, तर खूप वाईट वाटतं. तात्कालिक सन्मानासाठी काय काय करीत नाहीत! बोलणं आणि वागणं यातील विचित्रतेचं चित्र रस्त्यानं जाताना नाइलाजानं पाहावं लागतं. बौद्धिक ज्ञानासाठी परिश्रम लागतात. आधुनिक तारुण्याला ते नकोय. स्वच्छंदी आणि मुक्त जीवन जगावंसं वाटतं. आनंद ज्ञानात आहे, चुकीच्या वागण्यात नाही, हे तारुण्याला कळत नाही. ज्ञान हे अंधश्रद्धेतून विमुक्त करतंच; परंतु जीवनाला धनाशिवाय, सत्तेशिवाय धन्य करतं. तुकोबाराय स्वत:च्या जीवनविषयी बोलताना म्हणतात, ‘धन्य म्हणवीण इहलोकी लोका। भाग्ये आम्ही तुका देखियेला।।’ स्वत:ला काय म्हणवून घ्यायचं आहे, ते आपल्या इच्छेवर आहे. इच्छा ज्ञानाची असावी, धन आणि मान चालत येतात.

भोजन हे तनशुद्धी करणारं असतं. पंधरा दिवसांतून एक उपवास कॅन्सरपासून मुक्त करतो, हे संशोधन करणाऱ्या जपानी संशोधकाला, नोबेल परितोषिक देण्यात आलं आहे. आपण एकादशी करा, म्हणून सांगणाऱ्या संतांना अंधश्रद्धाळू म्हणतो. आपण आपल्या अज्ञानाला ज्ञान समजतो. सांगणाऱ्याला सामान्य म्हणतो. हित सांगणाऱ्याचा कंटाळा येतो. तारुण्य असावं; पण तारुण्याचा मद घातक आहे. केव्हा नशा उतरेल, काहीच सांगता येत नाही. वारी ही सामान्य नाही. वारीत आहारावर लक्ष देण्यात येतं. रोज वीस-पंचवीस किलोमीटर चालल्यानं व्यायाम होतो. मन भजनाच्या नादात रंगतं. तन, मन आणि विचार यांच्या शुद्धीसाठी आध्यात्मिक पर्यटनाचा मार्ग, म्हणजे वारी होय. ही वारी चुकू नये, म्हणून तुकोबाराय स्वत: देवाला प्रार्थना करतात. ‘पंढरीचा वारकरी। वारी चुको नेदी हरी।।’ ऊर्जेचं स्मरण, संतसंगती, विविधता, शुद्धता यांचं मिश्रण म्हणजे दिंडीसहित वारी होय. श्रद्धा असेल, तरच हे शक्य आहे; अन्यथा विकारमिश्रित जीवन जग जगतच आहोत. या जगण्यात शांती नाही, समाधान नाही. केवळ आणि केवळ श्वास घेणं चालू आहे. जीवन तर संत जगतात. भक्तीत रमतात, बोधात असतात, सहवासात वारी करतात. असं मिश्रण हवं

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने