Eknath shinde : 4 मंत्र्यांना नारळ मिळणार', सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकारण रंगलंय



ब्युरो टीम : राज्य मंत्रिमंडळातल्या चार मंत्र्यांबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केलाय. शिवसेनेच्या चार मंत्र्यांविषयी गौप्यस्फोट केल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकारण रंगलंय.

राज्य मंत्रिमंडळातले चार मंत्री भ्रष्ट आणि अकार्यक्षम आहेत, त्यामुळे त्यांना काढण्यासाठी भाजपच्या हायकमांडनं दबाव आणल्याची धक्कादायक माहिती संजय राऊतांनी जाहीर केलीय. इतकंच नव्हे तर त्या मंत्र्यांची नावं माहित असल्याचा दावाही संजय राऊतांनी केलाय. दोन वेगळे पक्ष आणि दबावाचा मुद्दा संजय राऊतांनी अधोरेखित केलाय.


'चार मंत्र्यांना काढा ते भ्रष्ट आहेत, अकार्यक्षम आहेत. या चार मंत्र्यांची नावं माझ्याकडे आहेत. भाजपच्या हायकमांडने या सो कॉल्ड शिवसेनेवर दबाव आणला आहे,' असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने