Keshav prasad mourya : राहुल गांधींच्या वक्तव्याला जनताच उत्तर देईल- केशव प्रसाद मौर्य

 


ब्युरो टीम : काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी देशाबाहेर जाउन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरूध्द विखारी वक्तव्य करणे आक्षेपार्ह असून याचे उत्तर जनताच लोकसभा निवडणूकीत जनताच देईल असे मत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सोमवारी सांगलीत व्यक्त केले.


सांगली लोकसभा मतदार संघातील दौर्‍यादरम्यान मौर्य यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना श्री. मौर्य म्हणाले, नैराश्याच्या विळख्यात देश सापडला होता, अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्रे हाती धेतली. गेल्या नउ वर्षाच्या कालखंडात नैराश्यातून आत्मनिर्भर भारत बनविण्याचे प्रयत्न केले. सध्या देशाची अर्थव्यवस्था जगात पाचच्या क्रमांकावर असून ती पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी सबका साथ, सबका विश्‍वास आणि विकास या धोरणातून प्रयत्न सुरू आहेत

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने