Abhishek-aishvarya : लग्नानंतर ऐश्वर्याने दिला अभिषेकसोबत काम करण्यास नकार; 'दोस्ताना'ची धुडकावली ऑफर



ब्युरो टीम : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन सोशल मीडियावर कायमच चर्चेत येत असते. यात बऱ्याचदा तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा तिच्या पर्सनल आयुष्याची चर्चा रंगत असल्याचं पाहायला मिळतं.

ऐश्वर्याने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं असून ही जोडी कलाविश्वातील आदर्श कपल म्हणून ओळखली जाते. गुरु या सिनेमामध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली होती. त्यानंतर ही जोडी फारशी एकत्र झळकली नाही. विशेष म्हणजे यामागे एक कारण असल्याचं म्हटलं जातं. लग्नानंतर ऐश्वर्याने अभिषेकसोबत काम करण्यास नकार दिल्याचं सांगण्यात येतं.

२००७ मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक या जोडीने लग्नगाठ बांधली. परंतु, त्यानंतर ही जोडी कोणत्याही सिनेमात एकत्र झळकली नाही. विशेष म्हणजे या जोडीला पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्यामुळे या दोघांना परत कधी एकत्र पाहता येईल हा एकच प्रश्न चाहते वारंवार विचारतात. मात्र, ही जोडी पडद्यावर एकत्र न येण्यामागे ऐश्वर्या कारणीभूत असल्याचं समोर आलं आहे.

'ढाई अक्षर प्रेम के' या सिनेमात पहिल्यांदाच ऐश्वर्या-अभिषेकने एकत्र काम केलं होतं. त्यानंतर 'कुछ ना कहो', 'उमराव जान', 'धूम 2', 'सरकार', 'गुरु', 'रावण' आणि 'सरकार राज' या काही मोजक्या सिनेमांमध्ये ते झळकले. परंतु, त्यानंतर ऐश्वर्याने अभिषेकसोबत काम करण्यास नकार दिला. विशेष म्हणजे अभिषेक झळकलेल्या 'दोस्ताना' या सिनेमासाठी ऐश्वर्याला विचारणा करण्यात आली होती. परंतु, तिने थेट नकार दिला.

अभिषेकमुळे ऐश्वर्याने दिला 'दोस्ताना'ला नकार

IMDb च्या रिपोर्टनुसार, 'दोस्ताना' या सिनेमातील नेहा या भूमिकेसाठी ऐश्वर्याला विचारणा करण्यात आली होती. परंतु, तिने या भूमिकेसाठी नकार दिला. ज्यावेळी ऐश्वर्याला ही भूमिका ऑफर झाली त्यावेळी तिचं आणि अभिषेकचं लग्न झालं होतं. मात्र, या सिनेमात अभिषेक जी भूमिका साकारत होता. त्या भूमिकेमुळे आपल्या वैवाहिक जीवनावर त्याचा परिणाम होईल असं कारण देत ऐश्वर्याने या सिनेमाला दिला.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने