Jaipur Mumbai Express : धक्कादायक! जयपूर ते मुंबई पॅसेंजरमध्ये गोळीबार,चार जणांचा मृत्यू



ब्युरो टीम : जयपूर-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघरनजीक चालत्या ट्रेनमध्ये ही गोळीबाराची घटना घडली. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

पालघर रेल्वे स्थानकाजवळ आज, सोमवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. आरपीएफ जवानाकडून हा गोळीबार करण्यात आला आहे. त्यानंतर आरपीएफ जवान चालत्या रेल्वे गाडीतून उडी मारू फरार झाला होता. पण, आरपीएफ जवानाला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर ते मुंबई ही पॅसेंजर एक्सप्रेस मुंबई सेंट्रलकडे जात होती. तेव्हा पालघर ते बोरिवली रेल्वे स्थानकादरम्यान गाडीत सुरक्षेच्या कारणास्तव कार्यरत असलेल्या आरपीएफ जवान चेतन याने एएसआय टिकाराम यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात टिकाराम यांच्यासह अन्य तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने