Nitesh rane : छत्रपती शिवराय हेच महाराष्ट्राचे खरे कुटुंबप्रमुख, नितेश राणेनी केली ठाकरे वर टीका



ब्युरो टीम : उद्धव ठाकरे नव्हे तर, छत्रपती शिवराय हेच महाराष्ट्राचे खरे कुटुंबप्रमुख आहेत, असे आ. नितेश राणेंनी म्हटलं आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत 26 आणि 27 असे दोन दिवस प्रसारीत केली जाणार आहे.

या मुलाखतीचा प्रोमो रिलिज करण्यात आला आहे. या प्रोमो च्या सुरुवातीला उद्धव ठाकरेंचा कुटुंबप्रमुख असा उल्लेख करण्यात आला आहे. यावरुन राणेंनी ठाकरेंसह संजय राऊतांना टोला लगावला आहे.

नितेश राणे म्हणाले, "उद्यापासून प्रसारीत होणारी उद्धव ठाकरे यांची मुलाखत म्हणजे हास्यजत्रेचा महाएपीसोड असणार आहे. तर उद्धव ठाकरेंना उद्देशून वापरलेला महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख या शब्दावर माझा आक्षेप असून, महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. आम्ही शिवरायांनाच महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख समजतो. जेव्हा ठाकरेंना जबाबदारी मिळाली, तेव्हा गळ्याला पट्टा लावून फक्त स्वतःच कुटुंब सांभाळलं. महाराष्ट्राला त्यांनी सांभाळलं नाही."

"अण्णा हजारेंनी मशाल हाती घ्यावी सांगणे ही उबाठा गटावर आलेली वाईट वेळ आहे. अण्णा हजारेंनी मातोश्री बाहेर आंदोलन करावं, सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी मातोश्रीत बसलाय. 26 जुलै च्या महापुरात बाळासाहेबांना एकट टाकून उद्धव ठाकरे फॅमिली सोबत ताज मध्ये राहत होते. उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांवर कलंक आहेत. संजय राऊत ऐवजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंकडून मुलाखत घेऊन दाखवा तर कळेल आवाज कुणाचा. बाबरी पडली तेव्हा उद्धव ठाकरे मातोश्रीच्या एका खोलीत कॅमेरा साफ करत होते." अशी टीका राणेंनी विधानभवन येथून प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने