Uddhav Thackeray : ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाची काव्यमय टीका, म्हणाले,"मुलाखत म्हणजे हास्यजत्रेच्या करामती.."



ब्युरो टीम : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘आवाज कुणाचा’ या पॉडकास्टसाठी सामनाने प्रदीर्घ मुलाखत घेतली. खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. मात्र, आता या मुलाखतीवर भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी कवितेच्या माध्यमातून उपरोधिक टीका करतानाच ठाकरे गटाला लक्ष केले आहे.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर भूमिका मांडताना राज्य सरकार आणि केंद्र सरकारला लक्ष्य केलं. मात्र भाजपाने आता या मुलाखतीवरच जोरदार टीका सुरू केली आहे. 'सत्तेच्या मस्तीत ‘राजा’ची गुंग होती मती,मुलाखत म्हणजे हास्यजत्रेच्या करामती..., असं म्हणत केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे. त्यांनी याबाबत एक कविताच ट्वीट केली आहे.

केशव उपाध्ये यांनी ट्विट केलेली कविता

‘विपरीत बुद्धी’ वाल्यांचा बुद्धिबळाचा डाव,

प्यादी निघून गेल्याचा सहनच होईना घाव !

इथे सरळ चालतो उंट अन् हत्ती तिरका,

आता, फक्त राजाच शिल्लक आहे बरं का !


सत्तेच्या मस्तीत ‘राजा’ची गुंग होती मती,

मुलाखत म्हणजे हास्यजत्रेच्या करामती !

प्रत्येक प्रश्नावर नुसत्या तोंडच्याच वाफा

तीच जुनी कॅसेट आणि नुसत्याच थापा !


‘वजीर’ देतो शिव्या, राखण्या राजाची मर्जी,

सारीपाटावर दोघांना मोहऱ्यांची एलर्जी,

घरातनं बाहेर न पडलेला पाहिलाय ‘राजा’

शेवटी, चेकमेट झाला अन् उडाला बँडबाजा !




0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने