Health : भात खात असाल तर १५ दिवस बंद करून पहा ;शरीरामध्ये तुम्हाला जाणवतील हे बदल

 

ब्युरो टीम :  भात खाल्ल्यामुळे मधुमेहाला आमंत्रण मिळते. तर लठ्ठपणाची देखील समस्या भातामुळे निर्माण होते. पण जर तुम्ही काही दिवस भात खाल्ला नाही तर त्याचे तुमच्या शरीराला फायदे होतील. तर भात खायचं बंद केल्यानंतर काय फायदे होतील याबाबत आता आपण जाणून घेणार आहोत.

बहुतेक लोकांना भात खायला खूप आवडते. त्यात भात खाल्ल्याशिवाय जेवण अपूर्णच असं म्हटलं जातं. त्यामुळे लोक भात आवडीने खाताना दिसतात. मग बिर्याणी असो पुलाव असो असे भाताचे वेगवेगळे प्रकार लोक आवडीने खातात. पण तुम्हाला माहिती आहे का हाच भात तुमच्या शरीरासाठी घातक ठरू शकतो. भात खाल्ल्यामुळे तुम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. भात खाल्ल्यामुळे आपले शरीर सुस्तावते कारण आपल्या शरीरातील कार्बोदकांचे प्रमाण वाढलेले असते.

शरीर नेहमी सक्रिय राहील- जर तुम्ही पंधरा दिवस भात खाल्ला नाही तर तुमचे शरीर सक्रिय होण्यास मदत होईल. कारण भात खाल्ला तर आपले शरीर सुस्तावते, आपल्याला झोप येते. अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. पण जर तुम्ही भात खाणं सोडलं तर तुम्हाला झोप येणार नाही आणि तुमचे शरीर सक्रिय राहील तसेच तुम्ही जास्त काळ काम देखील करू शकाल.

 


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने