ब्युरो टीम : आज वर्ल्ड कपमधील 33 वा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दुपारी दोन वाजता सामना सुरू होईल. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ अजून अपराजित आहे. भारताने सलग सहा सामने जिंकले असून आता सातव्या विजयासाठी रोहितसेना सज्ज असणार आहे. वर्ल्ड कपचा सामना मुंबईतील वानखेडेवर होणार असल्याने मुंबई पोलिसांनी सर्व क्रिकेट प्रेक्षकांना काही सूचना दिल्या आहेत.
पोलिसांच्या सर्व क्रिकेट चाहत्यांना सूचना-
सुरक्षा तपासणीमुळे शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी लवकर स्टेडियममध्ये वेळेआधी पोहोचावं. दुपारी दोन वाजेपासून सुरू होणाऱ्या सामनासाठी प्रेक्षकांना दुपारी 11.30 वाजेपासूनच मैदानात प्रवेश देण्यात येणार आहे. आक्षेपार्ह बॅनर, लायटर, ज्वलनशील पदार्थ आणण्यासाठी मनाही आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रेक्षकांनी लोकल ट्रेनचा वापर कराव कारण पार्किंगची कुठलीही सोय उपलब्ध नाही.
दिलेल्या सूचनांचं पालन करावं अशी विनंती मुंबई पोलिसांनी केली आहे. मरिन ड्राईव्ह जवळच असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. खबरदार म्हणून मुंबई पोलिसांना या सूचना दिल्या आहेत. सुरक्षा व्यवस्थेचा फायदा घेऊन कोणी काही घातपात करण्याचा प्रयत्न करू नये याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी आधीच सर्वांना सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, वानखेडे स्टेडियमवर कालच म्हणजेच मंगळवारी १ नोव्हेंबरला सचिन तेंडुलकर याच्या पुतळ्याचं अनावरण झालं. नव्या खेळाडूंना प्रेरणा मिळावी म्हणून सचिनचा पुतळा बसवण्यात आला आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बीसीसीआय सचिव जय शहा, आयसीसीसी आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि आदी मान्यवर उपस्थि होते.
वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या (VC.), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव
टिप्पणी पोस्ट करा