Maharashtra Bandh : उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मविआचा उद्याचा ‘महाराष्ट्र बंद’ मागे



ब्युरो टीम : महाविकास आघाडीच्यावतीने शनिवारी (२४ ऑगस्ट) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज, २३ ऑगस्ट रोजी सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने हा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असून राजकीय पक्षाला कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र बंद करण्याचा अधिकार नाही, असा निर्णय दिला आहे.  त्यानंतर हा बंद मागे घेण्यात आलाय. बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ  हा बंद पुकारण्यात आला होता.

उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर काँग्रेसने भूमिका स्पष्ट करत महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. मात्र, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यात विविध ठिकाणी काळा झेंडा आणि तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन करण्यात येणार आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने