ब्युरो टीम : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही, असा टोला लगावला होता. पवार यांच्या व टीकेला आता राज ठाकरे यांचे सुपुत्र मनसे नेते अमित ठाकरे यांनी मोजक्या शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.
अमित ठाकरे म्हणाले की, 'अजित पवारांवर बोलण्यासाठी मी खूप लहान आहे. यावर राज ठाकरेच उत्तर देऊ शकतील. पण मी पराभूत झालो असलो तरी खचलो नाही. या निवडणुकीतून मी खूप शिकलो. त्यामुळे मला फरक पडत नाही. मी एवढेच सांगेन की, माझ्या पहिल्या निवडणुकीवरून तर शेवटच्या निवडणुकीवरून माझे मूल्यमापन करा.'
नेमकं काय आहे प्रकरण?
राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या निकालानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मेळावा घेतला होता. यावेळी त्यांनी थेट अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. राज ठाकरे म्हणाले होते की, 'लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचा एकच खासदार निवडून आला, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ खासदार निवडून आले होते. त्यानंतर दोनच महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत इतकी तफावत कशी? अजित पवारांचे ४२ आमदार निवडून आले? त्यांचे चार पाच आमदार तरी येतील का? असे सगळ्यांना वाटत होते. कुणाचा तरी विश्वास बसेल का? जे इतके दिवस राज्यात राजकारण करत आले आहेत, ज्यांच्या जिवावर भुजबळ, अजित पवार मोठे झाले त्या शरद पवारांना फक्त १० जागा? न समजण्याच्या पलिकडची गोष्ट आहे,' अशा शब्दांत राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संशय घेतला होता.
मनसे प्रमुख राज ठाकरेंना स्वतःचा मुलगाही निवडून आणता आला नाही, अजित पवारांचे वक्तव्य
— मराठी Print (@Marathi_print) February 9, 2025
पहा #व्हिडीओhttps://t.co/efUFLPscEg#ajitpawar #amitthackeray #rajthackeray #maharashtravidhansabha #vidhansabhaelection2024 #maharashtra #maharashtrapolitics #MNS
राज ठाकरेंच्या टीकेवर अजित पवार म्हणाले होते की, 'राज ठाकरे यांनी त्यांना जे काय वाटते, ते म्हटले. त्याच्याशी आम्हाला काही घेणे-देणे नाही. जनतेने आम्हाला निवडून दिले. लोकसभा निवडणुकीत जेव्हा महायुतीच्या १७ जागा निवडून आल्या, तेव्हा आम्ही रडत बसलो नाही. तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि आम्हाला सांगता. यावेळेस आम्ही कष्ट घेतले होते, मेहनत केली होती. म्हणून आमचे आमदार निवडून आले. मलाही मागे माझ्या मुलाला निवडून आणता आले नव्हते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत माझ्या पत्नीला निवडून आणता आले नाही. तो कौल लोकांनी दिला होता, ईव्हीएममध्ये गडबड झाली, असे आम्ही म्हणालो नाही. जनतेने मतदान केले, लोकशाहीत आपण ते मान्य केले पाहीजे,' असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला होता. आता अजित पवार यांना अमित ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
@mnsadhikrut चे @amitrthackeray यांनी दिले @AjitPawarSpeaks यांना मोजक्या शब्दात दिले प्रत्युत्तर, म्हणाले...
— मराठी Print (@Marathi_print) February 9, 2025
पहा #व्हिडीओhttps://t.co/7dEjiuWDM1#ajitpawar #amitthackeray #rajthackeray #maharashtravidhansabha #maharashtra #maharashtrapolitics #MNS @RajThackeray https://t.co/qBJMJ2cRpb
टिप्पणी पोस्ट करा